Feedback Contact Us
 
YOU ARE HERE :   मुखपृष्ठ   »   संस्था - भारत विद्यालय - यशोगाथा
 
 
 
   
भा.शि.प्र.मं. संस्था
यशोगाथा @ भारत विद्यालय
आपल्या यशाची परंपरा कायम राखत भारत विद्यालयाने यशाची कमान चढतीच ठेवली आहे. विद्यालयाचा एकुण निकाल ९६.३३ टक्के लागला असुन प्रतिक राजेश तळोकार ह्याने ९८.४० टक्के गुण मिळवुन शाळेत प्रथम स्थान पटकावले आहे. सत्र २०१४-१५ या वर्षात ९० टक्केच्या वर ५७ विद्यार्थी असुन त्यांनी शाळेचे नावलौकिक केले.

शालांत परिक्षा एस एस सी मार्च २०१५ ला शाळेतुन परिक्षेला बसलेल्या एकुण २९५ विद्यार्थ्या पैकी २८६ विद्यार्थी पास झाले.

भारत विद्यालय ही अकोला जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य अशी शाळा म्हणुन नौवलौकिक आहे. शिक्षणातच नव्हे तर इतर क्षेत्रातही अग्रक्रम ठरणारी शाळा म्हणून ओळखली जाते. शाळेच्या सुवर्ण महोत्सवी पर्वात विद्यार्थ्यानी दिलेली ही मोठी देणगीच ठरली आहे.

शाळेचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्री. निशिकांत पुजारी, जेष्ठ उपाध्यक्षा श्रीमती शालीनीताई अभ्यंकर, कनिष्ठ उपाध्यक्ष श्री. अनिलजी पिंपरखेडे, सचिव श्री. उमाकांतजी जोशी तसेच सर्व व्यवस्थापन मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अभ्यंकर मडम, उपमुख्याध्यापिका डा. सौ. वर्षा पाटील, पर्यवेक्षक श्री. घोगरे सर तसेच वर्ग शिक्षक श्री. श्याम जोशी सर, श्री. मिलिंद कुळकर्णी सर, सौ. सुरेखा शास्त्री मडम, सौ. सरीता गावंडे मWडम व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
 
 
Go to Top